खुश कसे राहावे.

0
954
खुश कसे राहावे.
खुश कसे राहावे.

नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत खुश कसे राहावे. आपले स्वतःचे आरोग्य जपणे हे फक्त आपल्या आणि आपल्याच हातात असते. त्यामुळे कितीही तणावपूर्ण जीवन असो, मानसिक टेन्शन असो, तरीही आपण त्यातून खूश राहण्याचा मार्ग काढला पाहिजे. आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार हे येतच असतात. परंतु, त्यातूनही जर आपण आपल्या स्वतःसाठी आनंद शोधला, खुश राहिले तर त्यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहू शकते. प्रत्येक व्यक्ती असो तिला सुखदुःखाच्या मार्गातून जावेच लागत असते. आणि या मार्गातून हि त्या व्यक्तीने आनंद शोधला पाहिजे. हल्ली आजच्या काळामध्ये फार धकाधकीचे जीवन जगायला लागत असते. सारखे काम-काम करणे, काबाड कष्ट करणे, जीवन जगण्यासाठी पैसा कमावणे यासाठी प्रयत्न करावे लागत असतात. परंतु, ही कामे असताना देखील आपण आपला आनंद शोधला पाहिजे.

जर आपण आनंदी असू, आपले मन हे शांत व आनंदी असेल, तरच आपण पुढचे जीवन हे देखील सुखा-समाधानाने जगू शकतो. हल्ली शरीराला कुठलाही आजार जडला अथवा कुठलेही काम असले, तरी प्रत्येक गोष्टीचे आपण टेन्शन घेत राहतो. मानसिक तणाव हा वाढत राहतो. त्यामुळे, त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम पडू शकतो. त्यामुळे, आपले आरोग्य देखील जास्त बिघडू शकते. परंतु, परिस्थिती कशीही असो, कितीही दुःख असो तरी त्यातून आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे किती पण मानसिक टेन्शन असो, परंतु त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकत नाही. म्हणून यासाठी आपण सतत खुश राहिले पाहिजे. काही गोष्टी अशा असतात की त्याचे दुःख कमी तर होत नसते, परंतु जर आपण त्याकडे थोडे दुर्लक्ष करून, त्यातून देखील खुश राहिले, स्वतःला आनंदी ठेवले तर ते दुःख नक्कीच कमी होण्याचा प्रयत्न आपण करू शकतो.

तर मित्रांनो, आज आपण खुश कसे राहावे? या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग खुश कसे राहावे याबद्दल आपण खालील प्रमाणे अधिक माहिती जाणून घेऊयात.

खुश कसे राहावे :-

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ-उतार हे येतच असतात आणि जात देखील असतात. सुखा दुःखाच्या वाटेतून प्रत्येकालाच जावे लागत असते. परंतु त्यातूनही आपल्याला आनंद आनंद शोधता आला पाहिजे. जर आपण प्रत्येक गोष्टीचे टेन्शन घेत राहिले तर आपले आरोग्य देखील धोक्यात जाण्याची शक्यता असते म्हणून आपण कितीही वाईट परिस्थिती असो किंवा आपल्या आरोग्याबद्दल काहीही तक्रार असो परंतु त्यामध्ये आपण खूश राहण्याचा मार्ग शोधला पाहिजे. स्वतःला खूश ठेवले पाहिजे जेणेकरून आपले मानसिक आरोग्य देखील चांगले राहू शकते. तर मित्रांनो खुश कसे राहावे ? यासाठी आपण काय केले पाहिजे? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

  • आपल्याला कोणतेही काम करायचे असेल तर ते आपण आपल्या मनापासून करायला हवे. आपल्या कामाबद्दल वेडेवाकडे कोणी कितीही का बोलेना तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या स्वतःच्या कामामध्ये लक्ष घातले पाहिजे आणि त्यातून ही खूश राहण्याचा मार्ग आपण शोधला पाहिजे. आपण आपला जेवढा सकारात्मक विचार ठेवू तेवढा आपणही इतर गोष्टींपासून दूर राहू शकतो.
  • आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळत असते. काहीजण हे आपल्या कामाबद्दल आपली प्रशंसा करत असतात तर काही जण काही ना काही त्यातून तक्रारी शोधून काढत असतात. जर एखाद्याने आपल्या कामाबद्दल स्तुती केली प्रशंसा केली तर उत्तमच. तसेच, जो कोणी तक्रार करत असेल तर त्याबद्दल त्या व्यक्तीचा राग न मानता त्यातील उणिवा भरून काढल्या पाहिजेत. म्हणजे यातूनही आपल्याला शिकायला मिळत असते.
  • जर तुम्हाला अगदीच मानसिक टेन्शन आले असेल किंवा कशाना कशाबद्दल अस्वस्थता वाटत असेल, तर अशावेळी तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये वेळ घालवला पाहिजे. मित्र हे असे सोबती असतात की, आपण कुठलेही टेन्शन असो त्यांच्या सहवासामध्ये विसरून जात असतो आणि त्यांच्या सोबत खुश देखील राहू शकतो.
  • तसेच प्रत्येकाच्या जीवनात अशा काही गोष्टी असतात ते कोणाला सांगू शकत नाही. अशावेळी तुम्ही स्वतःचे एक डायरी तयार करावी आणि त्यामध्ये तुमच्या सर्व टेन्शन्स तुमच्या काही ज्या गोष्टी असतील त्या लिहून काढावेत. यामुळे तुमचे मन देखील हलके झाल्यासारखे वाटेल व तुम्हाला स्वस्त देखील वाटू लागेल.
  • काही जण हे विनाकारणच पुढच्या भविष्याची चिंता करत बसतात. म्हणजेच वर्तमान काळामध्ये जगून भूतकाळातील गोष्टी विषयी विचार करत बसतात आणि तसेच भविष्यकाळातील गोष्टींचाही विचार करत असतात. जेणेकरून, त्यांचे अर्धे आयुष्य यामध्येच निघून जात असते. म्हणून तुम्ही आज मध्ये जगून फक्त आजचाच विचार करायला हवा. आणि नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे. भूतकाळातील विचार तसेच भविष्याचा विचार न करता फक्त वर्तमान काळातील आयुष्य आनंदाने जगायला हवे.
  • जर तुम्हाला तुमचं आयुष्य किंवा तुमचे काही दिवस हे तणावरहित वाटत असतील, तर अशावेळी तुम्ही शांत राहायला हवे. तसेच, डोळे बंद करून दीर्घ श्वास घेऊन काही आनंदी क्षण आठवायला हवे. जेणेकरून, तुम्ही तनाव मुक्त होण्याचा प्रयत्न करू शकाल. डोळे बंद करून दीर्घ श्वास घेऊन तुम्ही काही तुमच्या आनंदी क्षणांचा विचार केल्यामुळे तुम्हाला तुम्ही तणावापासून मुक्त होण्यासाठी मदत होऊ शकते.
  • जेव्हा जेव्हा तुम्हाला टेन्शन येत असेल, मानसिक त्रास होत असेल, अशावेळी तुम्ही काही विनोदी जोक्स वाचायला हवेत किंवा कॉमेडी सिरीयल अथवा कॉमेडी मुव्हीज आवर्जून बघायला हवे. जेणेकरून,तुमचे मानसिक टेन्शन हे पटकन जाण्यास मदत होऊ शकते.
  • सकाळच्या वेळी अथवा संध्याकाळच्या वेळी निसर्गाच्या सान्निध्यात अथवा वातावरणामध्ये तुम्ही थोडसे रमले पाहिजे. जेणेकरून रममान निसर्गाचा अनुभव देखील येईल. शिवाय, तुम्ही तणावरहित अथवा तणाव मुक्त राहण्यास देखील मदत होऊ शकते.
  • जेव्हा जेव्हा तुमच्या पदरी निराशा येत असेल त्यावेळी, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी तुमच्या आवडीची काही तरी गोष्ट करायला हवी. कुणाला काही खाद्यपदार्थांमध्ये आवड असेल, तर त्यांनी खाद्य पदार्थ बनवण्यात वेळ काढला पाहिजे. प्रत्येकाची आवड ही वेगळ्या प्रकारची असते. कुणाला गाणे एकाला वाटते, तर कुणाला मुव्हिज बघायला आवडतात, तर कुणाला ड्रॉइंग्स करायला आवडते. म्हणजेच प्रत्येकाची आवड ही वेगळी प्रकारची असते तर त्याने त्याच्या आवडी मध्ये वेळ खर्च करायला पाहिजे.
  • तसेच अधूनमधून आपण आपल्या आवडते ठिकाणी फिरायला हवे. अथवा पर्यटन स्थळी जाऊन भेट द्यायला हवी. जेणेकरून आपला मूड देखील चेंज होण्यास मदत होऊ शकतो. आपण जेवढे आनंदी राहण्याचे प्रयत्न करू तेवढे आपले आरोग्य देखील चांगले प्रकारे राहू शकते.
  • कुठल्याही कामाबद्दल अथवा कुठल्याही गोष्टीबद्दल आपण इतरांवर भरोसा ना ठेवता स्वतःवरच भरोसा ठेवून ते पूर्णत्वास नेले पाहिजे. जेणेकरून, आपल्याला आपल्यात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करता येईल. शिवाय, ते काम आपण पूर्ण केल्याचा आनंद देखील आपल्याला मिळू शकतो. म्हणून आपण इतरांबद्दल अपेक्षा न ठेवता स्वतावर विश्वास ठेवला पाहिजे.
  • प्रत्येक व्यक्ती ही वाईटच असते असे नाही. तर आपल्या जीवनामध्ये काही लोक हे आपली दिशाभूल करत असतात. तर काहीजण, आपल्याला अचूक मार्ग दाखवत असतात. जर कुणी आपल्याशी वाईट वागत असेल, म्हणून आपण देखील वाईट वृत्ती स्वीकारायला नको. आपण अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करून चांगले सत्कर्म करत राहायला हवे.
  • कुठलेही काम असो त्यामध्ये निराशा न बाळगता आपण सतत आपले प्रयत्न हे चालू ठेवायला हवे. एक ना एक दिवस आपल्याला यश हे हमखास मिळू शकते. म्हणून आपण सतत आपले प्रयत्न हे चालू ठेवायला हवे.
  • आनंद हा इतर कुठल्याही व्यक्ती मध्ये शोधू नका अथवा कोणत्याही गोष्टींमध्ये शोधू नका. आनंद हा तुम्ही स्वतःमध्ये शोधला पाहिजे. तुम्ही जसे आहात तसे, तुम्ही तुम्हाला स्वीकारायला हवे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल आणि तुम्ही स्वतःला आनंदी देखील ठेवू शकाल.
  • असे म्हटले जाते की, आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढे खूश राहतो तेवढे आपले दीर्घायुष्य हे वाढत जाते. आपण कुठल्याही प्रकारचे जास्तीत जास्त टेन्शन न घेता स्वतः ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून, आपले आरोग्य देखील चांगले राहू शकते व आपण दीर्घायुष्य देखील होऊ शकतो.
वाचा  गाजर खाण्याचे फायदे

मित्रांनो, आपण आपले जीवन जेवढे तणावरहित जगू मानसिक टेन्शन याकडे दुर्लक्ष करून स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला, तर आपले शरीराचे आरोग्य देखील चांगले राहू शकते. शिवाय, आपल्यामध्ये आत्मविश्वास ते वाढत जातो. जितके आपण तणावरहित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू, तेवढे आपले दीर्घायुष्य देखील वाढत जाते. म्हणून परिस्थिती कशीही असो त्यातूनही आपण  आपल्याला खूश ठेवले पाहिजे.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कसे वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here