जुळी मुलं का आणि कशी जन्माला येतात

0
893
जुळी मुलं का आणि कशी जन्माला येतात
जुळी मुलं का आणि कशी जन्माला येतात

तर मित्रांनो आजकाल आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बघतो की बऱ्याच लोकांना जुळी मुलं होतात. याचे नक्की कारण काय असते किंवा असे कसे झाले याचा आपल्याला प्रश्न पडतो. ही पूर्णपणे सामान्य गोष्ट आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची ही गंभीर बाब नाही किंवा काळजी करण्याचे कारण नाही. जुळी मुले हे प्राण्यांपासून ते माणसांपर्यंत कोणालाही कशाही पद्धतीने होऊ शकतात. याचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. हा पण प्रत्येकाचे शरीर वेगळे असल्यामुळे बऱ्याच लोकांच्या शरीरावर थोडा दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट होऊ शकतो.

बाकी हे पूर्णपणे सामान्य गोष्ट आहे आणि तुम्हाला माहिती असेल तर आत्ताच्या जगामध्ये जुळ्या मुलांचे प्रमाण फारच वाढले आहे. याला अनेक कारणं असू शकतात जसे की याला आपले बदलते राहणीमान किंवा वैज्ञानिक शास्त्र देखील जबाबदार असू शकते. तर मित्रांनो आजचा आपला हाच विषय आहे की जुळी मुले कशी जन्माला येतात. तसेच यावर आपण काही प्रश्नांची उत्तरे देखील बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊया.

जुळी मुले होण्याची कारणे :

मुल जुळे होण्याची अनेक कारणे असू शकतात कारण की प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते. प्रत्येकाच्या शरीराची शारीरिक रचना वेगळी असते. तसेच बदलते वातावरण किंवा आपली बदलती जीवनशैली ह्याला देखील कारणीभूत ठरू शकते. म्हणजेच जुळी मुले होण्याची कारणे आपले शरीर देखील ठरू शकते किंवा बाह्य कारणांमुळे देखील जुळी मुले होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. तसेच बऱ्याच वेळेस मासिक पाळी नंतर देखील तुमच्या शरीरामध्ये बजेसे बदल होतात या बदलांमुळे देखील जुळे मुले होण्याची शक्यता असते.

वाचा  मनातली भीती घालवण्यासाठी काय करावे

जुळी मुलं कशी होतात :

आपण जुळी मुले होण्याचे कारण बघितली आता नेमका आपल्याला असा प्रश्न पडतो की जुळी मुले नक्की होता तरी कशी चला तर मग या प्रश्नाचे उत्तर बघूया की जुळे मुले नक्की कशी होतात. तर जुळी मुलं नक्की जन्माला येताना स्त्रियांच्या अंडाशय मध्ये जन्माला येतात. म्हणजेच पुरुषाचे शुक्राणू स्त्रीच्या अंडाशय पर्यंत पोहचतात आणि तेथून हळूहळू मुलाचा किंवा मुलीचा जन्म होण्यास सुरुवात होते. सामान्य आयुष्यामध्ये मुलगा किंवा मुलगी असे एकाचा जन्म होतो. पण कधीकधी अंडाशय मध्ये दोन अंडाशय विकसित होण्यास देखील सुरुवात होते आणि अशा प्रकारे दोन मुलांचा जन्म देखील होऊ शकतो. त्या दोघी मुलांचे लिंग हे वेगळे किंवा एकसमान देखील असू शकतात किंवा वेगवेगळे देखील असू शकतात.

या दोघांचे फिंगरप्रिंट वेगळे असतील पण या दोघांची ना एक समान जोडलेली असेल. तसेच या दोघांचे डीएनए देखील एकसारखेच असतील आणि हे दिसण्यास देखील बऱ्यापैकी एक समानच असतील. यालाच वैज्ञानिकाच्या भाषेमध्ये मोनोझिगोटिक असे देखील म्हणतात. ही प्रक्रिया पूर्णपणे साधारण आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचे काळजीचे कारण नाही. फक्त फरक एवढाच आहे की आपल्याला जर जुळी मुले होणार असेल तर थोडी अधिक काळजी घ्यावी लागू शकते.

जुळी मुले गर्भ धारण करण्यासाठी काय करावे ?

मुल होणे व जुळी मुलं होणे हे पूर्णपणे नशिबावर अवलंबून असते. यामध्ये कोणते प्रकारचे वनस्पती चे सेवन किंवा कोणत्याही प्रकारचे उपाय केल्यामुळे जुळी मुलांचे गर्भधारणा होणे शक्य नाही. तसेच वैज्ञानिक दृष्ट्या जर तुम्ही वैज्ञानिकांचा सल्ला घेऊन योग्य ती प्रक्रिया पूर्ण करत असाल तर कदाचित तुम्हाला जुळी मुलं होण्याची शक्यता असते.

जुळी मुले जर गर्भधारणेमध्ये असतील तर काय करावे ?

तर आपण जुळी मुले होण्याची कारणे बघितली तसेच जुळी मुले कशी होतात हे देखील जाणून घेतले. आता आपण जाणून घेऊया की जर आपल्या गर्भधारणेमध्ये जुळी मुले असतील तर आपण काय करावे तसेच कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी चला तर मग.

वाचा  मेथीचे लाडू खाण्याचे फायदे

तज्ञांचा सल्ला घ्यावा :

जुळी मुळे तुमच्या गर्भधारणेमध्ये असतील तर तुम्हाला थोडी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण जर एक मुलगा किंवा एक मुलगी जन्माला येणार असेल तर मातेला कमी त्रास सहन करावा लागतो. पण जर का जुळी मुलं जन्माला येणार असतील आणि जर ती गर्भधारणेमध्ये असतील तर मातेला बऱ्याच वेळेस खूप प्रमाणामध्ये वेदना सोसायला लागू शकतात. तसेच तुम्ही दर महिन्याला चेक करून बघावे की बाळाचे स्वस्तही नीट आहे की नाही. तसेच मातेचे स्वस्त देखील नीट आहे की नाही मातेचे हिमोग्लोबिन तपासणे हे फार गरजेचे आहे. कारण की आईच्या हिमोग्लोबिन व बाळाचे स्वास्थ्य यावर बाळाची प्रतिकारशक्ती अवलंबून असते. डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा व योग्य ट्रीटमेंट चालू करावी.

आहाराकडे लक्ष द्यावे :

तसेच आहाराकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. जर जुळी मुले गर्भधारण मध्ये असतील तर तुम्ही मुख्यता फळांचा सेवन करावे. दिवस बरा मधून एक ते दोन तरी फळ खावे. त्यानंतर फळांमध्ये देखील मुख्यता तुम्ही डाळिंब, बीट या फळांचा समावेश तुमच्या आहारात मध्ये करावा. जेणेकरून तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध राहील तसेच पुरेशा प्रमाणामध्ये पाणी प्यावे. तसेच आहारामध्ये पालेभाज्यांचा देखील समावेश करावा ताजे अन्न खावे बाशी अन्न शक्यतो टाळावे. महिना परतून दोनदा तरी पाणी नारळ पाणी प्यावे जेणेकरून तुमच्या शरीराची उष्णता कमी होण्यास मदत होईल.

अवजड सामान उचलण्याचा टाळावे :

जास्त जड व अवजड सामान उचलू नये कारण की जर तुम्ही अवजड सामान उचलले तर तुमच्या गर्भपिशवी वर त्याचा ताण येऊ शकतो. बाळाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ शकते. एक-चार महिन्यापर्यंत एवढी काळजी घेण्याची गरज नाही. पण चार महिन्यानंतर तुम्हाला खूप काळजी घेण्याची गरज आहे. याच प्रकारे डिलिव्हरी नंतर देखील तुम्ही बाळाची व आईशी याच प्रकारे काळजी घेऊ शकता.

वाचा  पिस्ता चे फायदे

योग्य विश्रांती घ्यावी :

तर विश्रांती घेणे फार गरजेचे आहे. कारण तुमच्या शरीराला योग्य ते विश्रांती भेटली नाही तर तुमच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. तसेच नुसते शरीरावर काय तर बाळावर देखील त्याचे विपरीत परिणाम होऊ शकता. तुमचे स्वस्त देखील बिघडू शकते आणि जर तुमचे स्वास्थ्य बिघडले तर एकंदरीत बाळाच्या स्वास्थावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला झोप येत नसेल तर झोपण्याआधी कोमट व हळद घातलेले दूध घ्यावे. जेणेकरून तुम्हाला झोप चांगली लागेल तुमची आणि याच बरोबर पचन क्रिया देखील सुधारण्यास मदत होईल.

तर मित्रांनो आज आपण जाणून घेतले की जुळी मुले कशाप्रकारे होतात. तसेच जुळी मुले होण्याची कारणे आहेत. जर तुम्हाला जुळी मुलांचे गर्भधारण झाले असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी हे देखील आपण बघितले. तसेच तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here