उसाचा रस पिण्याचे फायदे व तोटे

0
801
उसाचा रस पिण्याचे फायदे व तोटे
उसाचा रस पिण्याचे फायदे व तोटे

नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उसाचा रस पिण्याचे फायदे व तोटे. उन्हाळा म्हटला की आपल्याला थंड थंड प्यावेसे वाटत असते. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये उष्णतेचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरातील उष्णता देखील वाढत असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील तापमान वाढल्यामुळे आपल्या शरीराचे डीहायड्रेशन होऊ लागते. आपल्या शरीराचे डीहायड्रेशन होण्या पासून बचाव व्हावा यासाठी आपण जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे ठरते. त्याचप्रमाणे उन्हाच्या दिवसात आपण नारळ पाणी हेदेखील पिले पाहिजे. जेणेकरून आपले शरीर हे हायड्रेट राहण्यास मदत होऊ शकते.

आपण जितके जास्तीत जास्त पाणी पिले तितके आपले आरोग्य चांगले राहते. त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसात ऑरेंज सरबत,लस्सी, लिंबू सरबत, उसाचा रस यांसारखे पेय प्यावीशी वाटतात. उन्हाळ्याच्या दिवसात उसाचे महत्त्व हे निराळेच असते. शिवाय, उन्हाळ्याच्या दिवसात रस्ते रस्त्याने तुम्हाला उसाच्या रसाच्या गाड्या देखील दिसतील. अर्थातच उन्हाळा लागला म्हणजेच सर्वजण उसाचा रस पिण्याकडे वळत असतात.

उन्हाळा म्हटला तर उसाचा रस हा घेतला जातो. मित्रांनो, उसाचा रस प्यायला मुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरातील तापमान हे वाढलेले असते उष्णता वाढलेली असते अशा वेळेस जर तुम्ही उसाचा रस घेतला तर त्यामुळे तुमच्या शरीराला फायदा होत असतो एक प्रकारे थंडावा मिळण्यास मदत होत असते. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात उसाचा रस घेतल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील व्यवस्थित राहते शरीरातील पाणी कमी होण्यापासून बचाव होत असतो.

उन्हाळ्याच्या दिवसात उसाचा रस पिल्यामुळे कोणत्या प्रकारचा फायदा आपल्याला होऊ शकतात या विषयाबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. तर मित्रांनो, आज आपण उसाचा रस पिण्याचे फायदे व तोटे,या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग उसाचा रस पिण्याचे फायदे व तोटे या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात !

उसाचा रस पिण्याचे फायदे :-

उन्हाळा लागला की आपली पावले आपोआप उसाच्या गाडी कडे वळत असतात. अनेक जण उन्हाळ्याच्या दिवसात उसाचा रस आवर्जून पित असतात. उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे महत्त्व काही वेगळेच आहे. तर मित्रांनो उसाचा रस पिण्याचे फायदे या विषयाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

  • उन्हाळा लागला म्हणजे आपल्या शरीरातील तापमान वाढते. शरीरातील उष्णतेचे प्रमाण देखील वाढत असते. तर हे उष्णतेचे प्रमाण नियंत्रित असावे व शरीराला एकप्रकारे थंडावा मिळावा यासाठी आपण उसाचा रस पिणे फायदेशीर ठरू शकते. उसाचा रस पिल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता हे कमी होण्यास मदत होत असते.
  • उसाचा रस पिल्यामुळे आपले शरीर हे हायड्रेट राहण्यास मदत होते. शिवाय आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासत नाही पाण्याचे प्रमाण हे चांगल्या प्रमाणे राहण्यास मदत होते.
  • उसाचा रस पिल्यामुळे आपल्या शरीराची त्वचा ही चांगली राहण्यास मदत होते शिवाय त्वचेला ओलावा टिकून राहतो.
  • उसाचा रस हा थंड प्रवृत्तीचा असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या देखील येत नाही शिवाय चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी देखील मदत होऊ शकते.
  • उसाचा रस पिल्यामुळे आपल्याला कॅल्शियमचा पुरवठा होत असतो उसामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण चांगल्याप्रकारे असते ज्यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियमचा पुरवठा व्यवस्थित प्रकारे होऊन आपल्या शरीरातील हाडे बळकट व मजबूत राहण्यासाठी मदत होऊ शकते.
  • आपल्या शरीराला कॅल्शियमचा पुरवठा व्यवस्थित होत राहिला तर आपल्या ला हाडांचे विकार देखील जळत नाही संधिवात सारखे समस्या पासून आपण दूर राहू शकतो.
  • उसाचा रस पिल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते.
  • उसाचा रस पिल्यामुळे एक प्रकारे आपल्या शरीराला उर्जा प्राप्त होत असते ज्यामुळे आपण कोणतेही काम न थकता पूर्णपणे करू शकतो म्हणजेच शरीराचा थकवा जाण्यासाठी उसाचा रस केल्यामुळे फायदा होऊ शकतो.
  • उसाचा रस पिल्यामुळे आपल्या दातांना देखील त्याचा फायदा होऊ शकतो आपण काही यांना खाल्ले तर ते दातांमध्ये अडकून राहण्याची समस्येत असते शिवाय दातांमध्ये बॅक्टेरिया देखील जमा होत असतो. उसामध्ये असे काही घटक असतात अंडी बॅक्टेरियल असते ज्यामुळे आपल्या दातांचे संरक्षण होत असते म्हणजेच दातांच्या समस्या उद्भवत नाहीत.
  • उसामध्ये एंटीऑक्सीडेंट चे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते तसेच उसाचा रस पिल्यामुळे किडनीच्या आजारापासून देखील आपण दूर राहू शकतो.
  • उसाचा रस प्यायला मुळे थकवा काही क्षणातच दूर होतो. एक प्रकारे आपल्या शरीरामध्ये उत्साहा निर्माण होण्यास मदत होते.
  • उसाचा रस यामुळे आपल्या शरीरामध्ये एकप्रकारे पाचकरस तयार होतो म्हणजेच आपल्या शरीराची पचनसंस्था काही सुरळीत चालू राहण्यास मदत होते त्यामुळे आपणास पोटदुखीचा त्रास होत नाही.
वाचा  मासिक पाळी येण्यासाठी उपाय

मित्रांनो, उसाचा रस पिल्यामुळे एक ना अनेक प्रकारचे फायदे हे आपल्या शरीराला होत असतात. शिवाय यामध्ये अँटिक साड्यांचे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते उसाचा रस या मग अनापणा जीवनसत्त्वाचा पुरवठा होतो. तसेच आपल्या शरीरामधील पचनक्रिया हे देखील सुरळीत चालू राहिल्यामुळे पोटाचे विकार आपल्याला उद्भवत नाहीत. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या शब्दाने वाढल्यामुळे अनेक रोगांपासून संसर्गजन्य रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो.

उसाचा रस पिण्याचे तोटे : –

मित्रांनो, उसाचा रस पिल्यामुळे एक ना अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होत असतात. परंतु काही लोकांना उसाचा रस प्यायला मुळे त्रास होण्याची देखील शक्यता असते. शिवाय उसाचा रस हा मर्यादेतच घेतला पाहिजे जर अतिरिक्त प्रमाणात तुम्ही उसाचा रस प्यायला तर त्यामुळे तुमच्या शरीराला फायदा होण्या ऐवजी नुकसान होऊ शकते. तर उसाचा रस प्यायल्यामुळे कोणत्या प्रकारचे तोटे होऊ शकतात याबद्दल आपण आता जाणून घेऊयात.

  • उसाचा रस प्यायचा असेल, तर तो तुम्ही साधा प्यावा. कारण उसाचा रस यामध्ये बर्फाचे खडे टाकून आपणास दिले जाते. त्यामुळे तुम्हाला उसाचा रस पैसा असेल तर त्यावेळी तुम्ही त्याला साधा रस मागावा त्यामध्ये बर्फाचा समावेश करू देऊ नये नाहीतर यामुळे तुम्हाला सर्दीची समस्या येऊ शकते.
  • उसाचा रस हा एकदम थंडगार घेतला म्हणजे त्यामध्ये बर्फाचे तू कुठे टाकून दिले तर त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्याऐवजी ती वाढू शकते. यामुळे त्याचा आपल्या खेळायला त्रास होऊ शकतो.
  • ज्या लोकांना डायबिटीज असेल, अशा लोकांनी उसाच्या रसाचे सेवन करू नये. कारण उसाच्या रसा मध्ये साखरेचे प्रमाण हे जास्तीत जास्त असते. आणि जर तुम्ही जास्तीत जास्त उसाचा रस सेवन करत असेल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते व डायबिटीस सारख्या आजारांना सामोरे जावे लागते.
  • ऊसाच्या रसामध्ये जास्तीत जास्त साखरेचा समावेश असतो जर तुम्ही जास्तीत जास्त ऊसाचे रसाचे सेवन करत असेल तर त्यामुळे तुम्हाला वजन वाढण्याची समस्या येऊ शकते.
  • ज्या व्यक्तींना बीपीचा त्रास असेल तर अशा लोकांनी उसाचा रस पिणे टाळले पाहिजे. जर तुमच्या शरीरातील बीपी हा वाढत असेल अथवा वारंवार वाढण्याची समस्या येत असेल, तर नक्कीच तुम्ही उसाचा रस सेवन करू नयेत नाहीतर त्या मुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
  • उसाचा रस अधिक प्रमाणात पाहिल्यामुळे आपल्या छातीमध्ये कफ जमण्याची शक्यता असते. छातीमध्ये जर जास्तीत जास्त कफ जमा झाला तर त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकतात म्हणून जास्तीत जास्त तुम्ही उसाचा रस पिणे टाळले पाहिजे जेणेकरून तुम्हाला छातीमध्ये कफ होण्याची समस्या उत्तर होणार नाही.
वाचा  मानवी हृदयाचे वजन किती ग्राम असते

मित्रांनो, उसाचा रस प्यावा परंतु तो नियंत्रित असावा म्हणजेच मर्यादित असावा. जर एकाच वेळी तुम्ही जास्तीत जास्त उसाचा रस प्यायलात, तर त्यामुळे तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्तीचे होतील. कुठल्याही गोष्टीचा वापर हा मर्यादेतच केला पाहिजे, जर अति-प्रमाणात तर फायदा होण्याऐवजी नुकसानच होत असते. आपल्या शरीरातील रक्तामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रित असेल तर अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. उसाच्या रसा मध्ये साखरेचे प्रमाण हे जास्तीत जास्त असते त्यामुळे उसाचा रस तुम्ही अति प्रमाणात घेणे टाळावे.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे कळवू शकतात.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here